Posts

मुकद्दर

Image
चित्रपट, मालिका, कादंबऱ्या, कथा यांमधून दाखवलेला म्हातारा, धर्मवेडा, कोणाशीही सहज न बोलणारा औरंगजेब आणि त्याचे मूळ व्यक्तिमत्त्व ह्यात खूप फरक आहे. औरंगजेब केवळ आपल्याला प्रादेशिक पातळीवर चित्रपट आणि मालिकांच्या बजेटएवढाच किरकोळ दाखवला जातो. आपल्याला ठाऊक असलेला औरंगजेब फार मर्यादित आहे. आपल्याला माहीत आहे, आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या समोर तख्त-ए-ताऊसवर बसलेला औरंगजेब ज्याने 'न भूतो न भविष्यति' असा आपला झालेला अपमान पचवला. संभाजी महाराजांचा क्रूर छळ करून त्यांची हत्या करणारा औरंगजेब आपल्याला माहीत आहे, पण आपल्याला तो औरंगजेब माहीत नाही, जो वयाच्या पस्तिसाव्या वर्षी बुऱ्हाणपुरात आपल्या मावशीकडे गेलेला असताना एका बाईच्या प्रेमात पडला होता. तिच्या इष्कात तो इतका बेभान झाला होता की, तिच्याखातर इस्लामच्या विरोधात जाऊन तो दारूही प्यायला सुद्धा तयार झाला होता. आपल्याला औरंगजेब ठाऊकच नाही, ज्याने तख्त मिळवण्यासाठी आपल्या सख्ख्या भावाना मारून टाकलं. तो औरंगजेब माहीत नाही ज्याने फितुरी करून आपल्या भावाला युद्धात मदत केली म्हणून सख्ख्या मुलाला आजन्म कारावासात ठेवलं. आपल्या सख्

घनगड

Image
घनगड   trek ०५ नोव्हेंबर २०१७ बरेच दिवस झालेले गडवाटा धुंडाळल्या न्हवत्या आणि आठवडाभराच्या कामाच्या व्यापामुळे डोकंदेखील जाम झालेलं. स्वराजचाच मला फोन आला. शनिवारी किंवा रविवारी trek ला जाऊयात पण कुठे तरी नवीन ठिकाणी. मला देखील विचार करून गड ठरवायला सांगितलं. माझ्या डोक्यात सुधागड आला, मी केलेला नसल्यामुळे तिकोणा पण आला. पण तिकोणा त्याने केला असल्यामुळे आणि सुधागडला जायचं तर ताम्हिणी घाट पूर्ण उतरून जावं लागणार म्हणून ते cancle झाले. त्यानेसुद्धा बरीच नावं सांगितली आणि बऱ्याच विचाराअंती घनगडला जायचं ठरलं. मार्ग मुळशीकडूनच होता पण आमच्यासाठी काहीसा नवा होता. ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी ७:३०ला निघालो. Trek आधी मिसळ खाण्याची आमची प्रथा तर आहेच पण रविवार म्हटलं कि मिसळ ही पुण्याची सुद्धा एक प्रथा आहे. मग काय, प्रथेप्रमाणे पिरंगुटला श्रीपादची मिसळ खाल्ली आणि पुढच्या प्रवासाला लागलो. ऊन होतं पण सहन होईल एवढं. मुळशी धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात शेतकरी रानात त्यांची शेतीची कामे करत होती. काही शेतातली कापणीची काम पूर्ण झालेली तर काही अजून चालू होती. काही १०-१५ माणसं भगवे झेंडे घेऊन रस्त्याने

महात्मा फुले वाडा आणि राजा दिनकर केळकर संग्रहालय

Image
महात्मा फुले वाडा आणि राजा दिनकर केळकर संग्रहालय ०२ ऑक्टोबर २०२२ शिक्षणासाठी २०१२मध्ये मी पुण्या त राहण्यास आलो. त्या आधीच्या आयुष्यात, मी पुण्यात मोजून ४-५ वेळाच आलो असेल. पण २०१२पासून जी नाळ पुण्यासोबत जोडली गेली ती कायमचीच. गेल्या ऑगस्ट महिन्यात मला पुण्यात येऊन आता १० वर्षे पूर्ण झाली. या १० वर्षात पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात होत असलेली बरेचशी बदल, विकासकामं पाहिली. पुणे फिरलो. आजूबाजूचे किल्ले फिरलो, अजूनही बरेचशी बाकी आहेत. मला ऐतिहासिक अश्या वस्तू आणि वास्तू पाहायला, त्यांचा इतिहास जाणून घ्यायला, त्यांच्यामागील ऐतिहासिक गोष्टी ऐकायला खूप आवडतं. तसा नववीपर्यंत इतिहास हा माझा नावडताच विषय होता पण का कोण जाणे दहावीपासून इतिहासात आवड निर्माण झाली ती आज तागायत. त्यामुळे २०१२ला पुण्यात येण्याच्या आधीपासूनच पुणे शहरातल्या बऱ्याचशा जुन्या वास्तू, संग्रहालय, पेशवेकालीन मंदिर पहायची, आसपासची सगळी किल्ले पहायची असं मनाशी ठरवलं होतं. अशांपैकीच महात्मा फुले वाडा आणि राजा दिनकर केळकर संग्रहालय. गेल्या कित्येक वर्षांपासून तिथे जायचं म्हणत होतो पण घराच्

हिंदूत्व

Image
रत्नागिरीला नजरकैदेत असतांना सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा त्यांचा ग्रंथ लिहिला. तो १९२०च्या दशकात लिहिला गेलेला आहे, एवढे सांगितले म्हणजे देशातील त्यावेळच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचे वेगळे वर्णन करायची आवश्यकता राहत नाही. हा मूळ ग्रंथ सावरकरांनी टोपण नावाने इंग्रजीत लिहिला व त्याचे मराठी भाषांतर नंतर झाले. सावरकरांनी "हिंदूपण" किंवा "हिंदू असणे" याचे वर्णन करण्यासाठी "हिंदुत्व" हा शब्द वापरला. ‘हिंदुइझम’ (Hinduism) हा शब्द त्याआधी बर्‍याच काळापासून प्रचलित होता. पण तो न वापरता सावरकांनी हेतुत: ‘हिंदुत्व’ हा शब्द निर्माण केला. याचे कारण, ‘हिंदुइझम’ म्हटल्यावर त्या शब्दाचा अर्थ हिंदू धर्माशी जोडला जात असे, तसा तो अजूनही जोडला जातोच, पण सावरकरांना तो अर्थ अभिप्रेत नव्हता. जसे ममत्व, स्वत्व, मातृत्व, दातृत्व, उत्तरदायित्व, वगैरे तसे त्यांना अभिप्रेत होते ते ‘हिंदुत्व’. अर्थात्, हिंदुत्व म्हणजे ‘हिंदूपण’. सावरकरांनी हिंदुत्वाला वांशिक, सांस्कृतिक आणि राजकीय ओळख मानली. सावरकारांची हिंदुत्वाची व्याख्या कुठल्याही प्रकारे धार्मिक नाही. याउलट ती भाषा, जाती, ‘मतें’ (

तांबूल

Image
  तांबूल गौरीपुजनाच्या निमित्ताने यावर्षी पुन्हा तांबूल बनवण्याचा आणि खाण्याचा योग आला. त्यानिमित्ताने तांबूलबद्दल मिळालेली माहिती तुम्हासर्वांसोबत share करावीशी वाटली.  विड्याच्या पानाला चुना लावून, कात, सुपारी, वेलदोडा इ. घालून केलेला विडा म्हणजे तांबूल. तांबूल हा शब्द ऑस्ट्रो-एशियाटिक भाषावर्गातला आहे. तांबुलाचे त्रयोदशगुणवर्णन वराहमिहिराने बृहत्संहितेत केले असून इ. स. अठराव्या शतकातील योगरत्नाकार या वैद्यक ग्रंथात विड्याचे घटक म्हणून पान, सुपारी, कात, चुना, कापूर, कस्तुरी, लवंग, जायफळ इ. पदार्थांचा उल्लेख येतो. भारतातील कामशास्त्रीय ग्रंथांत आणि काव्यनाटकांतील शृंगारवर्णनात तांबुलाच्या या प्रणयपोषक प्रभावाचा उल्लेख वारंवार आढळतो. तांबूल खाण्याची प्रथा भारतीय असून, ती वेदपूर्वकाळापासून रुढ असावी. तांत्रिक आणि तंत्रप्रभावित उपासनेत, तसेच अन्य धर्माचारांत विड्याचे विशेष महत्त्व आहे. मंगलकार्यात पानसुपारी देतात. पूजोपचारांत देवतेपुढे नागवेलीच्या दोन पानांवर अखंड सुपारी ठेवतात. विडा वातहारक, कृमिनाशक, कफहारक असून दुर्गंधी नाहीशी करणारा आहे. तसेच तो मुखाची अशुद्धी नाहीशी करून मुखाला शोभा

"पंच्याहत्तरीतला भारत..."

Image
"पंच्याहत्तरीतला भारत..." १५ ऑगस्ट २०२१ सर्वात प्रथम देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🏻 एक मोठा पल्ला देशाने पार केला आहे. आपण आपला ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना, आपण जे साध्य केले नाही त्याबद्दल केवळ रागाने मागे वळून पाहू नये, तर आपल्याकडे काय आहे यावरही आश्चर्य व्यक्त केले पाहिजे. साडेसात दशके हा एक दीर्घ कालावधी आहे, जरी तो राष्ट्रांच्या इतिहासातील क्षणभंगुर क्षण आहे. तेव्हा जग वेगळे होते. तेव्हा भारत वेगळा होता. भारतीय अर्थव्यवस्था तेव्हा वेगळी होती. जर आपण सामाजिक-आर्थिक निर्देशकांच्या दृष्टीने पाहणार असू, तर १९४७ मध्ये सरासरी भारतीय असणे कसे होते हे आपल्याला सांगता येणार नाही कारण १९५०-५१ च्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांमध्ये समाविष्ट केलेला पहिला "White Paper"(Economic Survey) वाचला तर आज असलेल्या मानवी विकास निर्देशकांसारखे असे काहीही त्यात मिळत नाही. पण अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न ₹ २७४ होते जे आता १.३५ लाख आहे. लोकसंख्येची घनता (प्रति चौरस किलोमीटर) १९४७ साली ११४ होती ती आता ४१०

दुर्गराज दुर्गदुर्गेश रायगड (Raigad Fort)

Image
दुर्गराज रायगड २२ आणि २३ जून २०१९ हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि प्रत्येकाच्या मनातलं मानच स्थान असलेला रायगड किल्ला. आपला मान, स्वाभिमान आणि अभिमानाचा प्रतिक म्हणजे रायगड. अफाट असा रायगड.... युरोपिअन ह्या किल्ल्याला पूर्वेचा जिब्राल्टर असे संबोधतात. कारण जिब्राल्टर जितका अजिंक्य तितकाच रायगडही. दुर्गदुर्गेश्वराला विविध अशा १५ नावांनी संबोधिले आहे. १. रायगड, २. रायरी, ३. इस्लामगड, ४. नंदादीप, ५. जंबुद्विप, ६. तणस, ७. राशिवटा, ८. बदेनूर, ९. रायगिरी, ११. भिवगड, १२ रेड्डी, १३. शिवलंका, १४. राहीर, १५. पूर्वेकडील जिब्राल्टर महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येक माणसाची एकदा तरी रायगड किल्ला पाहाण्याची इच्छा असते. आता रोप-वेमुळे रायगड किल्ला लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवाक्या